मैफ़लींचा शोध घेत आणि त्यातलं मनाला भिडेल ते मित्रांनो, तुम्च्यासमोर ठेवायचं. खरं तर, कुणी काही सांगावं, ह्याची तुम्हाला गरज नाही. तरीही सगळे लेखक लिहीत राहीले. वास्तविक, ज्ञानेश्वर-रामदास-तुकाराम ह्यांच्यानंतर कुणीही काहीही सांगितलं नसतं, तरी चाललं असतं.दासबोधासारखा महान ग्रंथ, करमणुक करणारा ग्रंथ नव्हे. माणसांच्या वृत्तीतली एकही छ्टा तिथं निसटलेली नाही. मुंबईच्या शेअरबाजारात मध्यभागी बसून समर्थांनी सगळ्या वृत्ती टिपल्यासारख्या वाटतात. खरं तर दासबोधानंतर मराठी साहित्यात एकही ओळ कुणी लिहीली नसती तरी चाललं असतं. तरी इतकी पुस्तकं निघतात कारण... अहंकार. मलाही जग समजलयं हे सांगायचा अट्टहास.मी तरी एवढं लेखन का केलं ?मनाचे श्लोक वाचून गप्प बसायला हवं होतं.


जन्म
मार्च २५, १९३२
मृत्यू
जून २६, २००१

No comments:

Post a Comment